Posts

Showing posts from September, 2023

Useful Tools for Business operation ( Marathi)

Image
 मला नेहमी माझ्या व्यावसायिक मित्रांकडून विचारणा होते, "सागर सर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये असे कोणते ॲप्स आणि टूल्स वापरता ज्यामुळे तुमचे काम सोपे होते". त्याचीच माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. खालील लेख नक्की वाचा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. १) Google docs - व्यवसाय करताना आपल्याला विविध प्रकारचे डॉक्युमेंट लिहायचे असतात त्यामध्ये एखादा बिल बनवणे असो किंवा महत्वाची माहिती अथवा एखादा लेख आपण यासाठी गूगल डॉक्स या गूगलच्या टूल्सचा वापर करू शकतो. गूगलचे वेगवेगळे एप्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये डॉक्युमेंटसाठी Google Docs, गणिती आकडेमोड आणि इतर माहितीसाठी Google Sheet (Microsoft Excel सारखे आहे ) आणि Presentation साठी Google Slide चा वापर आपण करू शकतो. हे सर्व ऑनलाईन स्टोर होते याला आपण एडिट ही करू शकतो तसेच शेअर ही करू शकतो. २) ChatGpt - ChatGpt हा Open Ai या कंपनीने डेव्हलप केलेला Chatbot आहे. याचे फ्री आणि पेड व्हर्जन सध्या उपलब्ध आहे, आणि महत्वाचे म्हणजे याला तुम्ही मराठी भाषेमध्ये पण वापरू शकता, यामध्ये २०२१ पर्यंतची माहिती यामध्ये आहे. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्ती

हिरोजी इंदुलकर

 निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे शब्द सहसा ऐकायला मिळत नाहीत. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने करणारी फार कमी लोक असतात त्यातील एक नाव म्हणजे स्वराज्यातील स्थापत्य अभियंता " हिरोजी इंदुलकर" , स्वराज्याची राजधानी रायगड बांधणीचे काम त्यांच्याकडे होते. स्वराज्याच्या या कार्यात शिवरायांची अनुपस्थिती असताना त्यांनी प्रसंगी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च केले. सन १६७४ मध्ये रायगडावर जेव्हा राज्याभिषेक सोहळा सुरू होता तेव्हा महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना विचारणा केली "हिरोजी मागा आज आपणास काय हवे " त्या जागी दुसरी कोणती व्यक्ती असती तर त्याने नक्कीच त्याच्या फायद्याचे मागितले असते. पण या निष्ठावंत मावळ्याने महाराजांना एकच उत्तर दिले आणि ते शब्द इतिहासामध्ये कायमचे सोनेरी अक्षराने कोरले गेले " महाराज मला काही नको तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावर जगदीश्वराच्या दर्शनाला जाल तेव्हा आपल्या चरणांची धूळ माझ्या नावावर पडली पाहिजे" म्हणजे लोकहो मागितल काय तर फक्त एक पायरी , अशी निष्ठा, निस्वार्थी भावना, आपल्या मालकाबद्दल आणि त्या संस्थेबद्दल असलेली समर्पक वृत्ती कोठे पहाव

स्वराज्य स्थापना

 सन १३१८ मध्ये महाराष्ट्रातील यादवांचे राज्य नष्ट झाले आणि पारतंत्र्याचा सूर्य उदयास आला आणि पुढील ३१२ वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होई पर्यंत तो सूर्य अस्ताला जाईल आणि स्वातंत्र्याची अनुभूती होईल अशी अंधुकशी आशा देखील नव्हती. तो पर्यंत अनन्वित अत्याचार लोकांवर होत होते. आपल्या राज्यात आपणच परके झाले होतो मुघल, आदिलशाही, निजामशाही , सिद्धी, फ्रेंच, इंग्रज यांच्या सत्ताओढीच्या राजकारणात सामान्य माणूस होरपळून निघत होता. दिवसाढवळ्या स्त्रियांवर अमानुष अत्याचार अपहरण होत होते, शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस होत होती, अवाच्या सव्वा कर भरून शेतकरी हवालदिल झाला होता. अत्याचार फक्त परकीय सत्तांकडून नव्हे तर परकियांची चाकरी करणाऱ्या स्वकियांनकडून पण होत होता. याचा अस्त होण्याची सुरवात झाली सन १६४५ ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या निवडक सवंगड्यान सोबत रायेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा झाली, त्यानंतर दोनच वर्षात महाराजांनी १६४७ मध्ये तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, का गरज होती स्वराज्याची सुरक्षा, पिळवणूक,अत्याचार , आर्थिक सुबत्ता या ना अनेक सर्व

शिवराय आणि स्त्रीदाक्षिण्य

 कोणत्याही समाजाची प्रगती किती झाली आहे, याच आकलन त्या समाजातील स्त्रियांचे त्या समाजात किती स्थान आहे, त्यांचा किती आदर राखला जातो यावरून अंदाज लावला जातो. स्वराज्यामध्ये स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते, महिलांवर अत्याचार, अन्याय करणाऱ्यांची गय केली जात नसे कठोर अशी शिक्षा केली जात असे. सन १६४६ च वर्ष असेल शिवाजी महाराज फक्त १६ वर्षाचे होते , स्थानिक कुलकर्णी याचाकडून महाराजांकडे एक पत्र येते रांजे गावचा पाटील बाबाजी गुजर याने एका गरीब घरातील पोरगी बाटवली हे कळताच त्याला महाराजांसमोर हजर करण्यात आले व त्याची पाटीलकी जप्त करून त्याचा चौरंग करण्याचा आदेश देण्यात आला. मोगली फौजेतील रायबाघीन हिचा  उंबरखिंडीच्या लढाईत महाराजांच्या विरोधात लढताना पराभव झाला तेव्हा ती पकडली गेली तेव्हा तिला तिच्या हुद्या नुसार योग्य ती सन्मानाची वागणूक देऊन तिचा आदर सत्कार करून तिला सुखरूप तिच्या छावणीत पोहचवले. महाराज दक्षिण दिग्विजय करून परतत असताना कर्नाटकातील बेलवडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई महाराजांच्या विरोधात लढल्या त्यावेळी त्या स्त्रीचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा के